वाॅशिंग्टन – भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा सहकार्य (India-US security cooperation) आगामी काळात खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन म्हणाले होते की भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध 21 व्या शतकाची दिशा ठरवतील. मी या मताशी सहमत आहे, असा दावा उच्च अमेरिकी अधिकारी रिचर्ड वर्मा ( Richard Verma) यांनी केला आहे. वर्मा यांनी अलीकडेच भारताला भेट दिली आणि आता एका ब्लॉगमध्ये त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याच्या अफाट शक्यतांबद्दल सांगितले.
दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या अपार शक्यता
रिचर्ड वर्मा हे यूएस स्टेट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजमेंट आणि रिसोर्सेस डिपार्टमेंटचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी भारतात अमेरिकी राजदूत म्हणूनही काम केले आहे.
रिचर्ड वर्मा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, बायडेन आणि नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, भारत आणि अमेरिकेचा एकमेकांवर होणारा प्रभाव खूप महत्त्वाचा आहे, परंतु आपण जगासाठी काय करू शकतो हे अधिक महत्त्वाचे आहे. अन्न सुरक्षा, साथीच्या रोगांना सामोरे जाणे आणि डिजिटल अर्थव्यवस्था ही अशी क्षेत्रे आहेत जिथे दोन्ही देश खूप काही करू शकतात.
वर्मा यांच्या मते…
१. संरक्षण, लोकशाही मूल्ये आणि तंत्रज्ञान ही तीन महत्त्वाची क्षेत्रे
२. या तीनही क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य महत्त्वाचे
३. गेल्या काही दशकांमध्ये उभय देशांमधील संबंधांत सुधारणा
४. दोन्ही देश एकत्रितपणे आपली संरक्षण क्षमता वाढवू शकतात
५. उभय देशांत माहितीची देवाणघेवाण वाढवणे महत्त्वाचे
६. संरक्षणविषयक जागरुकता आणि सागरी सीमांचे संरक्षण वाढवणे गरजेचे
७. संपूर्ण हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेत भारताची भूमिका महत्त्वाची
८. उदयोन्मुख तंत्रज्ञानातही दोन्ही देशांमधील सहकार्य आवश्यक
९. सायबर हल्ले आणि त्याच्या धोक्यांचा सामना करण्यात मदत
१०. दोन्ही देशांनी डेटा सुरक्षिततेसाठीही काम करावे
(India-US security cooperation will be a ‘game changer’ – Richard Verma)