नवी दिल्ली – कोविड 19 च्या लसीकरणामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. एकट्या उत्तर प्रदेशात लसीकरण घेतलेल्या सगळ्या लाभार्थ्यांचा आकडा हा 6,73,542 इतका आहे.
देशभर सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेध्ये आजपर्यंत 57.75 लाख लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. एकूण लसीकरणामध्ये 53 लाख 04 हजार 546 आरोग्य कर्मचारी आणि 4 लाख 70 हजार 776 अन्य काम करणारे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात 3,58,473 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1,15,178 एवढी केंद्र झाली आहेत. लसीकरणाच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये रोज सातत्याने वाढ होत आहे.
गेल्या 24 तासात भारतामध्ये दैनंदिन मृत्यूंची संख्या 80 पेक्षा कमी नोंदविली गेली आहे, गेल्या 9 महिन्यातील ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील सक्रीय रुग्ण संख्या 1.48 लाख इतकी आहे. भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1.05 कोटी इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.19 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 12,059 इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर, गेल्या 24 तासांमध्ये 11,805 इतके रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.07 टक्के रुग्ण हे सहा राज्यांमधील आहेत. केरळमध्ये एका दिवशी 8,178 इतक्या सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली. तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 1,739 इतके रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडू मध्ये 503 इतकी संख्या आहे.
दैनंदिन नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद केरळमध्ये 5,942 इतकी करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,768 तर कर्नाटकमध्ये 531 इतकी रुग्णांची नोंद आहे.
गेल्या 24 तासाच 78 मृत्यूंची नोंद आहे.