औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा देशाला त्यांची जहागिर समजत असून एमआयएम यावर शांत बसणार नाही. 20 डिसेंम्बरला नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आम्ही राज्यभर आंदोलन करणार असल्याचे जलील म्हणाले.
औरंगाबादेतून शहरात 20 डिसेंबरला आझाद चौकातून मोर्चाची सुरूवात होईल. या मोर्चासाठी सर्व सेक्युलर संघटनांना सोबत घेणार असल्याचे जलील म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जानेवारीत असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते .