इंफाळ : करोना विषाणुच्या संसर्गाच्या संभाव्य धोक्यामुळे मणिपूर सरकारने भारत म्यानमार आंतराष्ट्रीय सीमा सील केली आहे. म्यानमारलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच मणिपूर क्षेत्रातल्या चौक्यांवर जायला सरकारने मज्जाव केला असल्याचे, राज्याच्या गृहविभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
राज्य पोलीस, जिल्हा प्रशासन, आसाम रायफल्स आणि सीमा शुल्क विभागांना या आदेशाचे कडक पालन करायचे निर्देश राज्यसरकारने दिले आहेत.
मणिपूर शेजारच्या मिझोरामनेही सोमवारी म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमा बंद केल्या आहेत आणि प्राणघातक करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशी लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशनेही परदेशी व्यक्तींच्या दौर्यावर अशाच प्रकारच्या बंदी घातली आहे. त्याच्या काही दिवसानंतर मणिपूर आणि मिझोरामनेही हा निर्णय घेतला आहे.