दुबई – कसोटी क्रिकेटमध्ये आता खरोखरच भारतीय संघ क्रमवारीत अव्वलस्थानी आला आहे. यावेळी कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी दोनवेळा आयसीसीने जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली होती व त्यावेळी भारतीय संघ अव्वलस्थानी असल्याचे सांगितले होते. मात्र, काही क्षणातच ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाच अव्वलस्थानी असल्याचे जाहीर केले होते.
ऑस्ट्रेलिया गेल्या 15 महिन्यांपासून कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. त्यांना दुसऱ्या स्थानी ढकलत आता भारतीय संघ 121 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीला जवळपास एक महिना बाकी असतानाच आयसीसीने नव्या गुणांसह ही क्रमवारी जाहीर केली.
ऑस्ट्रेलियाचा संघ 122 गुणांसह अव्वलस्थानावर होता. भारताचे 119 गुण होते. मे 2020 ते मे 2022 पर्यंत झालेल्या सर्व मालिकांचाच या गुणांकात विचार करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे गुण 122 वरून 116 असे घसरले. दुसरीकडे भारताला 2019-20 साली न्यझीलंडकडून 2-0 अशी कसोटी मालिका 2-0 अशी गमवावी लागली होती. मात्र, त्याचाही विचार हे गुण बहाल करताना झालेला नसल्याने भारताचे गुण 119 वरून 121 झाले.