बेल्हे – राजुरी जवळील आबटेक (ता.जुन्नर) येथील अशोक सोनवणे या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या 4 शेळ्यांचा बुधवारी (दि. 26) पहाटे बिबट्याने फडशा पडला.
नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे 65 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल असून संबंधित शेतकऱ्यांने नुकसान भरपाईची प्रशासनाकडे मागणी केली आहे.
आळे वनपरिमंडळ अधिकारी एस. के. साळुंखे, वनरक्षक जे. बी. सानप यांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी वन अधिकारी तसेच ग्राहक पंचायतचे संघटन मंत्री बाळासाहेब औटी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच बुधवारी रात्री राजुरी येथील सोपान कदम या शेतकऱ्यावर दोन बिबट्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला.