मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज पत्रकार परिषदेत भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशातील पाच राज्यांचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यानुसार भाजपला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात यश मिळवता आले. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले आहे. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. इतकेच काय तर सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबर धारवीहून अदाणीच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत त्या ठिकाणीं धारावीवासियांना राहायला मिळाले पाहिजे. यासोबतच पोलीस सफाई कर्मचारी यांना देखील राहायला संधी मिळाली पाहिजे. धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेच आहे 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी.
टीडीआर सक्ती करणार असाल त रमग त्याचे सरकारला अधिकार का देता? सरकारने ते आपल्याकडे घ्यायला हवं. अदानी यांचं भल कसं होईल असा सरकारने प्लॅन केला आहे. जर टीडीआर हा विषय समोर येणार असेल तर सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवं. 20 टक्के सरकार आणि 80 टक्के अदानी असा विषय सध्या झाला आहे.”
पुढे ते म्हणाले, “धारावीचा विकास झालाच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. धारावीचे विकासांच्या कामाबाबात संशय येत आहे. धारावीच्या गलिच्छ वस्तीला सोन्याचा भाव आला. तेथील व्यावसायिकांना देखील जागा मिळाल्या पाहिजे. विकास कामांमुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटला आहे. नियोगन शून्य कामामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सरकार केवळ कंत्राट काढत आहे. हे कॉन्ट्रॅक्ट सरकार आहे. अभ्युदय नगर बांद्रा रिक्लेमेशन हे देखील अदानीलां देण्यात येणार आहे अशी माहिती मिळली आहे. केवळ अदानीसाठी सगळं करत आहेत त्यामुळेच 16 तारखेला भव्य मोर्चा अदानीचा ऑफिसवर काढण्यात येईल. मुंबईला संपवण्याचे काम कोणी करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईकडे वाकड्या डोळ्यांनी पाहाल तर याद राखा- उद्धव ठाकरे
धारावीकरांना मी आवाहन करतो की, गुंडगिरी करून तुमच्याकडून कोणी घर बळकावत असेल तर आमच्याकडे या. मुंबई कुणालाही रिकाम्या पोटी झोपून देत नाही. प्रत्येकाला ती आसरा देते. त्यामुळे १६ तारखेला मी सर्वांना आव्हान करतो की मोर्चामध्ये सहभागी व्हा. मुंबईकडे वाकड्या डोळ्यांनी पाहाल तर याद राखा, हे सांगण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.