पुणे – बँकेला एटीएमची सुविधा उपलब्ध झाल्यापासून हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ग्राहकांना आवश्यकता भासते तेव्हा बरेचदा ते एटीएम वापरतात. प्रत्येक बँकेत एका महिन्यात एटीएम वापरण्याची मर्यादा असते. अन्यथा अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
पण तुम्हाला माहिती आहे का, की एटीएम सेवेदरम्यान इतरही अनेक शुल्क आपल्या खात्यातून वजा केले जातात. खात्यात कमी शिल्लक असल्यास ट्रांझेक्शन फेल होऊ शकते. अशा परिस्थितीत बँका दंड वसूल करू शकतात.
व्यवहार अयशस्वी झाल्यास दंड
आपण कधीही एटीएममधून पैसे काढणार असाल तर खात्यात किती शिल्लक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बरेचदा लोक याकडे लक्ष देत नाहीत आणि एटीएममधून पैसे काढतात. नंतर व्यवहार अयशस्वी झाल्यावर हे कळते की खात्यात शिल्लक कमी राहिल्यामुळे रक्कम काढू शकले नाही. अशा परिस्थितीत बँक ग्राहकांकडून दंड वसूल करते. त्यावेळी तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने जेव्हा जेव्हा तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, तेव्हा बँक त्यातील मागील दंडाची रक्कम वजा करते. ही चूक वारंवार केल्यास ती दुहेरी दंड देखील लागू करू शकते.
कोणत्या बँकेत किती शुल्क आकारले जाते ?
कमी बॅलन्समुळे एटीएम व्यवहारात बिघाड झाल्यावर सर्व बँका शुल्क आकारतात. तथापि प्रत्येक बँकेचे शुल्क वेगवेगळे असते. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या अयशस्वी व्यवहारासाठी ते जास्तीत जास्त 25 रुपये घेतात. एसबीआय 20 रुपये, आयडीबीआय बँक 20 रुपये, येस बँक 25 रुपये आणि अॅक्सिस बँक 25 रुपये घेते.