मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे मागणी केली आहे.
माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं तेच मी सांगतोय त्यामुळे दुसरं कोणी काय म्हणतंय याकडे आम्ही लक्ष देत नाही. असं अनिल परब यावेळी म्हणाले. “उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा काटे मागे फिरवत येणार नाही असं कोर्टाने म्हंटल याचा अर्थ यामध्ये इनलीगल ऍक्टिव्हिटी झाली आहे हे न्ययालयाने मान्य केले आहे.”
जजमेंटची कॉपी हातात आल्यानंतर अध्यक्षांकडे जाऊन यावर लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा अशी मागणी करू असं देखील परब म्हणाले. तसेच जर मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता बाकी असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा कोर्टाला बाहेत काढायला लावू नये अशी मागणी देखील यावेळी अनिल परब यांनी यावेळी केली.
कोर्टाने नोंदवली महत्वाची निरीक्षणे
भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती..
राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे
ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असत
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे.. त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा
सुनील प्रभू योग्य प्रतोद कोर्टाचा निर्णय
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा – कोर्ट