पंढरपूर – शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संयमाने भूमिका घेतली असती तर शिवसेनेचे 56 आमदार हे भाजपसोबत असते असे विधान त्यांनी आज केले आहे.
मुख्यमंत्रिपद कोणाला यावरून सेना-भाजपची युती तुटली त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत युती करून सरकार स्थापन केले व शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. तेव्हापासून भाजप व शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.
गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काहीना काही टीका करत असतात, त्याच वेळेस ते संयमाने वागले असते तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 56 आमदार दिसले असते असे विधान त्यांनी आज केले आहे. ते पंढरपूर मध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.