एग्रा, दि. 21 – ममता बॅनर्जींनी बंगाल मध्ये केवळ तुष्टीकरणाची राजनिती करून सण आणि उत्सव साजरा करण्यावरही मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले पण राज्यात भाजप सत्तेवर आल्यास हे निर्बंध काढून टाकले जातील आणि सर्वांना धार्मिक सण उत्साहाने साजरे करता येतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
आज येथे आयोजित करण्यात आलेल्या एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की ममता बॅनर्जी यांनी केवळ विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणाचेच काम केले आहे. तथापि भाजप सत्तेवर आल्यास सोनेरी बंगालच्या प्रस्थापनेसाठी आम्ही कार्यरत राहु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की पश्चिम बंगाल मधील शाळांमध्ये सरस्वती पुजन केल्याने येथील विद्यार्थ्यांना मारहाण केली गेली आहे. तृणमुलच्या सरकारने लोकांना सरस्वती पुजनही करण्यास मज्जाव केला आहे. तथापि आमचे सरकार सत्तेवर आल्यास कोणतेही धार्मिक विधी किंवा उत्सव करण्यावर निर्बंध असणार नाहीत असे त्यांनी नमूद केले.