मुंबई – देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ च्या नाऱ्याची पुन्हा एकदा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. नुकत्याच प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलतांना मी पुन्हा मी पुन्हा येईन असं म्हणत मविआ सरकार टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले, भाजप पक्षाला फार काळ विरोधी बाकावर बसायचे नाही. राज्यात जेव्हा सत्तेत होतो त्यावेळी विरोधी पक्ष बलवान नव्हता त्यामुळे हे ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही. यावेळी फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे ”मी पुन्हा येणार”ची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर बेईमानी केल्याचा आरोपही केला आहे.
दरम्यान, सत्ताधारी ठाकरे सरकारच्या येत्या काही दिवसांत विकेट पडणार आहेत. असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असतो. तर यावरून ठाकरे सरकारच्या नेते भाजप पक्षातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक दिसून येत आहे.