राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आश्वासन
बिबवेवाडी – एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. रिक्त जागांवर प्रवेश या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन मी राज्य सरकारशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यास सांगतो, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.
करोनाच्या भीतीने अभियांत्रिकी,फार्मसी, एम.बी.ए.ची पूर्वप्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त जागांवर प्रवेशाची संधी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कृती समितीकडून पुणे राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले. त्यावेळी राज्यपालांनी सदर आश्वासन दिले. राज्यपालांनी या विषयाचे गांभीर्य समजून घेतले.
यावेळी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष सुरेश आप्पा जैन, अभिजित महामुनी, शैलेश बडदे, प्रशांत गांधी, अजिंक्य पालकर, तौसिफ शेख, मयूर उत्तेकर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.