नवी दिल्ली – भारताने चांद्रयान-3 मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत.
आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केलं असून, संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या चांद्रयान-3 ने चांद्रभूमीला यशस्वी स्पर्श केला आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच स्वप्न साकार झालय.
दरम्यान, या यशस्वी लँडिंग नंतर ‘चांद्रयान-3’ने एक संदेश पाठवला आहे. “मी माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आणि तुम्ही पण” असा खास मेसेज पाठवला आहे. याबाबत इस्रोने ट्वीट करत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटले आहे की, “चांद्रयान-3 मिशन : भारतीय, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण.
ईएसएकडून ट्रॅकिंग सुरू..!
ईएसएकडून चंद्राच्या पृष्ठभागावरील ऑपरेशन्ससाठी लॅंडरला मदत करण्यात येणार आहे. तसेच, रोव्हरने मिळवलेला वैज्ञानिक डेटा इस्रोकडे सुरक्षितपणे पोहोचवण्यास मदत करणार आहे. अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडताच ईएसएने Gonhilly Earth Station द्वारे ऑपरेट केलेल्या अँटेनासह ट्रॅकिंग सुरू केले होते.
कर्नाटकातील बायलालू या गावात हे अंतराळ ट्रॅकिंग स्टेशन आहे. यामुळे दूरवरच्या अंतराळयातून टेलिमेट्री आणि वैज्ञानिक डेटा शोधणे, ट्रॅक करणे, आदेश देणे आणि प्राप्त केली जातात.