पुणे -शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त केल्या जाणाऱ्या घटस्थापनेसाठी सकाळी सकाळी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत मुहुर्त आहे, असे पंडित वसंत गाडगीळ यांनी सांगितले. या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते.
नवरात्री उत्सव वर्षातून दोनदा साजरा केला जातो. जे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री म्हणून ओळखले जातात. शारदीय नवरात्री ही अनीती आणि असत्यावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. वर्षातील या नऊ दिवसांवर देवी दुर्गा ही पृथ्वीवर तिच्या माहेरघरी येते. अशा परिस्थितीत हे नऊ दिवस दुर्गोत्सव म्हणून साजरे केले जातात.
हा शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो. देशाच्या विविध भागांमध्ये विविध स्वरुपात हा उत्सव साजरा केला जातो. विशेषत: बंगाल आणि गुजरातमध्ये त्याचे सौंदर्य अधिक विशेष आहे.
पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीचे शेवटचे चार दिवस म्हणजे षष्ठी ते नवमीपर्यंत दुर्गोत्सव साजरा केला जातो. तर या काळात सादर होणारे गरबा नृत्य प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापन केली जाते. यादरम्यान अनेक भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास ठेवतात.