मुंबई – मराठी रंगभूमी ते बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाच्या गुणांनी, स्वभवामुळे अभिनेते ‘नाना पाटेकरां’नी आपली खास भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक चढ उतार पाहिलेला हा रूपेरी पडद्यावरील सुपरस्टार आणि बॉलिवूडचा खरा अॅंग्री यंग मॅन अभिनयापलिकडे आपलं सारं स्टारडम विसरून एका सामान्य माणसाचं आयुष्य जगात असल्याचं नेहमीच दिसून आला आहे. नाना पाटेकर यांची बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांसोबत घनिष्ठ मैत्री आहे. मात्र, अश्याच एका जवळच्या मित्राचा गमतीशीर किस्सा नानांनी नुकतंच सांगितलं आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ सिनेमाला नुकतीच 44 वर्ष पूर्ण झाली. ‘सिंहासन’ हा सिनेमा 1979 साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी विशेष हजेरी लावली होती.
दरम्यान, यावेळी बोलताना अभिनेते नाना पाटेकर यांनी या सिनेमाबाबतचे काही किस्से आणि आपले अनुभव सर्वांशी शेअर केले. ‘सिंहासन’ या सिनेमासाठी नाने पाटेकर यांनी तीन हजार रुपये मानधन मिळालं होतं. त्यावेळी शंभर रुपयांत चार जणांनं रेशन भरलं जात असे”. असं नाना यावेळी म्हणाले.
तसेच नाना पुढे बोलताना म्हणाले, एक काळ असा होता की… ‘मी नसीरुद्दीन शहा यांचा अपघात व्हावा यासाठी देवाकडे नवस केला होता. त्यांचा अपघात व्हावा त्यांचा हात किंवा पाय मोडावा असं मला वाटत होतं. या मागचं कारण म्हणजे नसीरुद्दीनकडे असलेल्या सर्वा भूमिका या मला मिळाव्या अशी माझी इच्छा होती.
मात्र, असं कधीच घडलं नाही. आणि त्यामुळे माझा देवावरचा विश्वासच उडाला.’ असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले. दरम्यान, नानांनी हा गमतीशीर किस्सा सांगताच तेथे उपस्थीती लोक खुप हसू लागले होते. 1 जानेवारी 1951 दिवशी कोकणात नाना पाटेकरांचा जन्म झाला. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.
कधी शेतकर्यांसाठी आणि कधी दुष्काळग्रस्तांसाठी रांगड्या नाना पाटेकरांच्या व्यक्तिमत्त्वातील काही हळवे पैलू कदाचित तुम्हांला ठाऊक नसतील. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी नाट्यक्षेत्र, सिनेमा ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे.