नवी दिल्ली – आपण कोणाला लोणी लावायला जाणार नाही. तुम्हाला योग्य वाटले तर मला मत द्या नाहीतर देऊ नका असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्या सगळ्या चर्चांना स्वत: गडकरी यांनीच पूर्णविराम दिला असून आपला निवृत्तीचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते गडकरी?
26 मार्च रोजी नागपुरातल्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते, आता कोणाला फार लोणी लावायची माझी तयारी नाही. तुम्हाला वाटले तर ठिक आहे नाहीतर नवीन कोणीतरी येईल. त्यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर गडकरी यांनाच त्याचा खुलासा करावा लागला आहे. माझी राजकारणातून संन्यास घ्यायची इच्छा नाही. प्रसारमाध्यमांनीही अशा बातम्या देताना जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.