पुणे (प्रतिनिधी)- अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. हे वादळ मुबंईपासून सध्या 670 किलोमीटर तर सुरत पासून 900 किलोमीटर अंतरावर आहे. किनारपट्टीच्या जवळ आल्यानंतर परिसरातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
सध्या कोकण किनारपट्टीवर पावसाला सुरूवात झाली आहे.संध्याकाळ नंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे वादळ तीन जून रोजी संध्याकाळी मुंबई महाराष्ट्रसह गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. या वादळामुळे हानी होऊ नये म्हणून राज्य व केंद्र सरकारने आत्तापासून पुर्वतयारी सुरू केली आहे. एनडीआरएफच्या दहा तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. मुबंई पालघर, ठाणे, रत्नागिरी रायगड या ठिकाणी प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.