पुणे – ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी झाला यावरून त्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी कळतात. आज पासून वर्षाचा ९ वा महिना म्हणजेच सप्टेंबर महिना सुरु होत आहे.
वैदिक ज्योतिषानुसार जी लोकं सप्टेंबर महिन्यात जन्माला येतात त्यांच्यात कोणते गुण असतात त्यांची बौद्धीकता, त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांचे शिक्षण आणि भविष्यच्या दृष्टीने ते कसे घडतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत….
१) सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप उदार मानले जातात. तसेच, या महिन्यात जन्मलेले लोक स्वतःला खूप महत्त्व देतात. आणि विशेष म्हणजे या लोकांना स्वतःच्या विरोधात काहीही ऐकायला आवडत नाही, म्हणून कधीकधी ते समाजापासून अलिप्त होतात. आणि शांत जीवन जगतात.
२) हे लोक ध्येयाने झपाटलेले असतात. स्वत:च्या प्रचंड प्रेमात असतात. त्यांच्याबद्दल दुसऱ्याने काही टीका केलेली त्यांना सहन होत नाही. परंतु ते नेहमी या भ्रमात असतात, की आपल्यापेक्षा शांत आणि विनम्र दुसरे कोणीच नाही. टोमणे मारण्यातही हे लोक चांगलेच अग्रेसर असतात.
३) सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते. कामाच्या बाबतीत ते तहानभूक विसरून मान पाठ एक करतात. आणि आपले ध्येय गाठतात. दिवसाचे चोवीस तास काम करण्याची त्यांची तयारी असते.
४) शर्यत कोणतीही असो, त्यात स्वत:ला अग्रेसर कसे ठेवायचे हे यांच्याकडून शिकावे. कधी कधी शर्यतीत पुढे राहण्यासाठी ते स्वार्थीदेखील होतात. दुसऱ्यांकडून आपले काम काढून घेण्यासाठी वाट्टेल तेवढे गोड बोलतील. तसेच प्रेमातही त्यांचा अहंकार आडवा येतो.
५) या महिन्यात जन्मलेल्या मुलींबद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडतील. अर्थात हे कौतुकाने नाही, तर गमतीने म्हटले आहे. या महिन्यात जन्मलेल्या मुली स्वत:ला सर्वज्ञ समजतात. याच इगो प्रॉब्लेममुळे प्रेमाच्या तसेच वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अपयशी ठरतात.
सध्या चालू असलेल्या सप्टेंबर महिन्यात अनेक प्रसिद्ध लोकांचा जन्म झाला आहे.
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, लता मंगेशकर, आशा भोसले, ते बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर कपूर, सुखविंदर सिंग आणि पंकज त्रिपाठी यांचा समावेश आहे.