वाघोली प्रतिनिधी) – मुळा मुठा नदीवर हिंगणगाव – खामगाव टेक येथील भागासाठी शासनाकडे पाठपुरावा करून नदीवर पूल बांधून नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या पाठबळावर सोडवणार असल्याचा निर्धार ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुशराव बापूराव कोतवाल यांनी व्यक्त केला आहे.
हिंगणगाव तालुका हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अंकुश बापूराव कोतवाल यांची तर उपसरपंचपदी सुखदेव जयवंत कांबळे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांचा निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काळ भैरवनाथ ग्राम विकास पॅनलचे प्रमुख कुंडलिक अर्जुन थोरात, प्रमोद गावडे ,किसन दादासाहेब थोरात व इतर यांच्या शुभहस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर थोरात, सुभाष गायकवाड, विद्या थोरात,अपर्णा थोरात, शशिकला पोपळघट, लंका वेताळ,रुपाली गायकवाड, माजी सहायक फौजदार किसन थोरात,माजी सरपंच विजय गायकवाड, व्हाईस चेअरमन दत्तात्रेय कोतवाल, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल थोरात, माणिक वाबळे, संतोष वेताळ, संतोष काची, गुलाब भिसे, विशाल गायकवाड, माऊली थोरात, बाळासाहेब धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल चे पॅनल प्रमुख कुंडलिक थोरात यांनी सांगितले की ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुशराव कोतवाल यांना ग्राम विकासाच्या योजना गोरगरिबांना पर्यंत लवकर पोहोचवण्याचा चांगला अनुभव आहे. अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच सांडपाण्याचा प्रश्न याबाबतीत ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारी मंडळाकडून आगामी काळात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठ पुरावा करण्यात येणार असून या माध्यमातून हिंगणगाव चा चेहरामोहरा बदलवणार आहे.