मुंबई : अर्भकात व्यंग असल्यामुळे व्यथीथ झालेल्या 28 आठवड्याच्या आणि 24 आठवड्याच्या दोघा गर्भवती महिलांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. अर्भकाला असलेला मेंदूचा आजार आणि प्रसुतीनंतर महिलांच्या जिवाला असलेला धोका असल्याचा जे.जे. रुग्णालयाच्या आणि पुण्याच्या डॉक्टरांनी दिलेला अहवालाची दखल घेत न्यायालयाने गर्भपात करण्यास परवानगी दिली.
एमटीपी कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर महिलेला गर्भपात करता येत नाही. गर्भपात करायचा झाल्यास त्याकरिता न्यायालयाची परवानगी बंधनकारक असल्याने 28 आठवड्यांच्या आणि 24 आठवड्याच्या गर्भवती असलेल्या दोन महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन गर्भपातासाठी परवानगी देण्याची विनंती करणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. या याचिकेवर न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.