नवी दिल्ली – राजस्थानच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिरोही जिल्ह्यातील माउंट अबू येथे 231 मिमी पावसाची नोंद झाली सिरोही, अजमेर, पाली, करौली, जयपूर, जालोर, टोंक आणि सीकरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, माउंट अबूमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडला, तर सिरोहीमधील अबू रोड येथे 160 मिमी, अजमेरमध्ये 137 मिमी, पालीमधील बनीवास येथे 128 मिमी आणि करौलीमधील मासलपूरमध्ये 120 मिमी पाऊस पडला, तर जयपूरमधील सांभर, जालोरमधील बगोडा येथे 99 मिमी पाऊस पडला. सीकर, अजमेर, जयपूर, भरतपूर, उदयपूर, पाली, बरन, भिलवाडा, नागौर आणि सवाई माधोपूर या भागातही मुसळधार पावसाची नोंद झाली.राजधानी जयपूरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचल्याने सोमवारी अनेक भागात वाहतूक कोंडी झाली.
हवामान विभागाने अलवर, बांसवाडा, बारण, भरतपूर, दौसा, धौलपूर, डुंगरपूर, करौली, सवाई माधोपूर, सिरोही, उदयपूर, बारण, बुंदी, डुंगरपूर, झालावाड, कोटा, प्रतापगड आणि सवाई येथे अतिवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला आहे.
#WATCH राजस्थान: ड्रोन वीडियो अजमेर से है जहां भारी बारिश के कारण सागर झील ओवरफ्लो हो गई। pic.twitter.com/2smDRlVn6v
— ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2023
दिल्लीतही रेकॉर्डब्रेक पाऊस
गेल्या दोन दिवसांत दिल्लीत रेकॉर्डब्रेक पाऊस झाला असून त्यामुळे राष्ट्रीय राजधानीला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांत 15 घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये 2 ठार आणि 7 जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.