चेन्नई – तामिळनाडूमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. राज्यातील वेल्लोर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक घर कोसळले असून या अपघातात चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 1 ऑक्टोबरपासून तामिळनाडूमध्ये आतापर्यंत सामान्यपेक्षा 61 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडू जोरदार पाऊस सुरु आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात अतिवृष्टीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: चेन्नईमध्ये पावसाचे पाणी घरे, रुग्णालये आणि शाळांमध्ये घुसले आहे. मुसळधार पावसामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Tamil Nadu | Nine people died in sleep after their house collpased due to incessant rainfall in Pernambut, Vellore this morning. Deceased include 4 women, 4 children and a man. Injured have been rescued: Collector TP Kumaravel Pandian pic.twitter.com/Sd2uPUSTSK
— ANI (@ANI) November 19, 2021
दरम्यान, चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस, सशस्त्र राखीव दल, तामिळनाडू विशेष पोलीस आणि होमगार्डचे एकूण 75,000 पोलीस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या 11 तुकड्या आणि एसडीआरएफच्या सात तुकड्या मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. बचाव कार्यासाठी तामिळनाडूमध्ये 11 आणि पुद्दुचेरीमध्ये 2 पथके तैनात करण्यात आली आहेत.