RAM MANDIR – आज तपश्चर्येला 500 वर्षे पूर्ण होत आहे. भगवान श्रीराम आज अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना रामदेव बाबा म्हणाले,’जे जय श्रीराम म्हणणार नाहीत, त्यांचा लवकरच रामनाम होणार आहे. जीवनातले असे कोणतेही आदर्श नाहीत, जे प्रभू श्रीरामांकडून शिकता येणार नाहीत. ही प्राणप्रतिष्ठा म्हणजे येणाऱ्या रामराज्याची नांदी आहे’ असेही ते म्हणाले त्यांचे विधान सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.