नवी दिल्ली – मेवात, गुरुग्राम, फरिदाबाद आणि रेवाडी हे हरियाणातील चार जिह्ल्यात वाद आणि दगडफेकीनंतर निर्माण झालेला तणाव निर्माण झाला आहे. यामुळे येथे कलम 144 कलम लागू करण्यात आली आहे. मेवातच्या नूह भागातून हा तणाव सुरू झाला. हिंदू संघटनांनी काढलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. यानंतर काही वेळातच दगडफेक आणि पन्नास गाड्या पेटवण्यात आल्याच्या घटना समोर आल्या. या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एका स्थानिकांचा मृत्यू झाला असून 10 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.
“Today’s incident is unfortunate, I appeal to all the people to maintain peace in the state. The guilty will not be spared at any cost, strictest action will be taken against them,” tweets Haryana CM Manohar Lal Khattar on Nuh incident.
(File Pic) pic.twitter.com/ogirCiGbwf
— ANI (@ANI) July 31, 2023
सुरुवातीला हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात मेवातचे पोलिस दलही कमी पडले. अशात गुरुग्राममधून मेवात पोलिसांना हिंसाचारग्रस्त भागात पाठवण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांनी मेवातहून गुरुग्रामकडे जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केली. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले. दुसरीकडे, होमगार्ड नीरज (स्टेशन खेरकी डौला) आणि होमगार्ड गुरसेवक (स्टेशन खेरकी डौला) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इतर सर्व जखमी पोलिसांवर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणातील मेवात-नूह परिसर गो-तस्करीच्या वादात आधीच अत्यंत संवेदनशील आहे. देशाच्या राजधानीपासून हा परिसर अवघ्या दीड तासाच्या अंतरावर आहे. मेवातसारख्या भागात धार्मिक यात्रेवर दगडफेक करण्यात आली. मंदिराला घेराव घालून हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिरात शेकडो लोक अडकले असल्याचा दावा करण्यात आला होता.
फरिदाबादमध्ये शाळा बंद
शेजारच्या नुह जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचारानंतर, फरिदाबादच्या उपायुक्तांनी 1 ऑगस्ट रोजी सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. दुसर्या आदेशात, फरिदाबादच्या उपायुक्तांनी नूहमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू केले आहे.