मुंबई – जुलै महिन्यापासून स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी सकारात्मक येत असली तरी यावर्षी विकासदर 0 टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचे पतधोरण समितीने म्हटले आहे.
मात्र विकासदर 0 टक्क्याच्या खाली किती पातळीपर्यंत जाईल, यावर भाष्य करण्याचे पतधोरण समितीने टाळले आहे. अनेक पतमानांकन संस्था आणि विश्लेषकांनी यावर्षी भारताचा विकासदर उणे 5 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो असे म्हटले आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंक आणि अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती वेगाने पूर्ववत होत आहे.