नवी दिल्ली : झुंडबळींबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहणाऱ्या 49 नामवंताविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या घटनेशी सरकारचा काही संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नामवंतांवर दाखल केलेला हा गुन्हा मागे घेण्याची मागणी द्रविड मुळनेत्र कळघमचे अध्यक्ष एमके स्टॅलीन यांनी केली आहे.
सरकारने कोणतीही फिर्याद दाखल केली नाही. व्यक्तीगतरित्या कोणीतरी न्यायलयात गेले, त्यावर न्यायालयाने आदेश दिला, असे जावडेकर म्हणाल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे. बिहार पोलिसांनी शुक्रवारी दोन महिन्यांपुर्वी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यात शाम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, मणी रत्नम्, शुभा मुदगल, अपर्णा सेन, कोंकणा सेन आणि अनुराग कश्यप यांचाही समावेश होता,