मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता. जेव्हा अभिनेता गोविंदा एकामागून एक हिट चित्रपट देत होता. 80-90 च्या काळात गोविंदा आपल्या हटके स्टाईलची खूप प्रसिद्ध होता. त्याचप्रमाणे, तो शूटला उशीर येण्यासाठी देखील ओळखला जात होता. गोविंदाच्या या दिरंगाईचा परिणाम बिग बी अमिताभ बच्चन आणि थलाईवा रजनीकांतला देखील सहन करावा लागला होता.
गोविंदाने अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना त्याच्या ‘हम’ या चित्रपटातील एका सीनसाठी एक-दोन दिवस नव्हे तर 5 दिवस वाट पाहायला लावली होती. हम चित्रपटाच्या सेटशी जोडले गेले. ही गोष्ट नुकतीच प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आणि निर्माता रवी दिवाण यांनी त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितली.
रवी दिवाण म्हणाले की, आम्ही तिन्ही कलाकारांची उपस्थिती लक्षात घेऊन वेळापत्रक ठरवायचो. त्यानंतर तिन्ही कलाकार एक सीन शूट करण्यासाठी उटीला पोहोचले होते. अमिताभजी आणि रजनीकांतजी इतके चांगले कलाकार आहेत की ते कॉल टाइमच्या अर्धा तास आधी पोहोचायचे.तर गोविंदा सकाळची शिफ्ट असेल तर दुपारी पोहचायचा असा खुलासा रवी यांनी यावेळी केला.
एका सीनसाठी या तिघांनी सोबत दिसणं गरजेचं होत. आम्ही गोविंदाची तब्बल पाच दिवस वाट पाहिली मात्र तो कधीच वेळेत आला नाही. त्यामुळे चित्रपटातून तो सिन वगळण्यात आला असल्याचे रवी यांनी यावेळी सांगितलं. त्याच्या उशिरा येण्याबद्दलचे कारण देखील आम्हाला कधीच कळू शकले नाही असंही रवी यांनी स्पष्ट केलं.