मुंबई – अमरावती शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा निर्णय घेतला. चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला होता. आता हाच निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यातील सर्व महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची राहणार आहे.
राज्यातील महाविकासआघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी घेतलेला निर्णय दिलासादायक आहे. त्यानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १२ ऐवजी ८ असणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे.
Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey
(File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY
— ANI (@ANI) September 24, 2021
या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.’ असं खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट्द्वारे म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2021
पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून ८ तासांची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे.