शेवगाव/पाथर्डी -अचानक झालेल्या पावसामुळे जे संकट ओढावलेले त्या धीर सोडू नका, या संकट काळात शासन आपल्या पाठीशी आहे. अधिकारी व त्यांची पथके व्यवस्थित पंचनामे करुन अहवाल सादर करतील. शासन आपल्याला योग्य पद्धतीने मदत करील अशी ग्वाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुरग्रस्तांना दिला.
मंत्री तनपुरे यांनी आज शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेवगाव तालुक्यातील वडुले, भुगर, वरुर, खरडगाव व आखेगाव तर पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे, कोळसांगवी,