Gourav Vallabh joins BJP| लोकसभा निवणुकीपूर्वी आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नसल्याने आणि देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा गैरवापर करू शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर काही वेळातच गौरव वल्लभ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला.
गौरव वल्लभ काय म्हणाले?
गौरव वल्लभ यांच्यासोबत बिहार काँग्रेसचे नेते अनिल शर्मा आणि आरजेडी नेते उपेंद्र प्रसाद यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताना ते म्हणाले, ‘माझ्या मनातील सर्व व्यथा मी राजीनामा पत्रात लिहून ठेवल्या होत्या, ज्याची माहिती मी वेळोवेळी काँग्रेस पक्षाला दिली होती. प्रभू रामाचे मंदिर बांधले पाहिजे आणि आम्हाला आमंत्रण मिळाले आणि आम्ही ते आमंत्रण नाकारले तर काँग्रेस पक्षाने आम्ही जाऊ शकत नाही, असे लिहून द्यावे, मी हे स्वीकारू शकत नाही, असा माझा नेहमीच विश्वास आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘सनातन धर्माचा अपमान होत असताना मला गप्प बसणे शक्य होणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सनातन धर्मावर मोठे प्रश्न उपस्थित केले, त्यांची उत्तरे का दिली गेली नाहीत? ते म्हणाले की मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि मला आशा आहे की मी माझ्या क्षमतेचा आणि ज्ञानाचा उपयोग भारताला पुढे नेण्यासाठी करेन.’
VIDEO | Former Congress leader Gourav Vallabh (@GouravVallabh) joins the BJP in New Delhi. pic.twitter.com/SYh16ZQvmn
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2024
गौरव वल्लभ यांनी उदयपूरमधून लढवली होती विधानसभा निवडणूक
गेल्या वर्षी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट वादात गौरव वल्लभ यांनीही उघड भूमिका घेतली होती आणि अशोकच्या समर्थनार्थ विधाने केली होती. 2022 मध्ये त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. 2023 मध्ये त्यांनी राजस्थान विधानसभेची निवडणूक उदयपूरमधून लढवली होती. मात्र, त्यांचा भाजप उमेदवार तारचंद्र जैन यांनी 32 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. गौरव वल्लभ यांनी 2019 मध्ये झारखंडच्या पूर्वेकडील जमशेदपूरमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.
संबित पात्रांना विचारलेल्या प्रश्नामुळे आले होते चर्चेत
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासोबत एका हिंदी वाहिनीवरील वादविवादानंतर गौरव वल्लभ देशभर चर्चेत आले होते. या चर्चेदरम्यान संबित पात्रा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत पाच लाख कोटी रुपयांची चर्चा केली होती. या चर्चेत त्यांच्यासमोर उपस्थित असलेल्या गौरव वल्लभ यांनी त्यांना विचारले की एक ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात. यावर संबित पात्रा यांनी अस्पष्ट उत्तर देत हा प्रश्न राहुल गांधींना विचारला पाहिजे असे म्हटले होते. सप्टेंबर 2019 मध्ये प्रसारित झालेला हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता.
हेही वाचा:
‘आता ४० गद्दारांनी विचार करावा…’ ; तिकीट वाटपाच्या मुद्दावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला