Uddhav Thackeray On Election Commission : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली आहे. आज ते बुलडाण्यात होते. यावेळी चिखली येथील जनसंवाद सभेला संबोधित करताना त्यांनी निडणूक आयोगाचे नाव आजपासून धोड्या ठेवले असल्याचे म्हंटले.
ठाकरे म्हणाले, कुणीतरी माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेले नाव दुसऱ्याच कुणाला तरी दिले. आज लोकशाही आहे. त्यामुळे मी सुद्धा लोकशाहीच्या अधिकारात निवडणूक आयोगाचे नाव बदलून धोंड्या असे ठेवतो. तसेच सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही व एकाधिकारशाही उलथावून लावण्यासाठी यावेळी त्यांनी जनतेला एकत्र येण्याचेही आवाहन केले.
उद्धव ठाकरे यांच्या बुलडाणा येथील सभेतील मोठे मुद्दे –
– सर्व प्रकल्प गुजरातला, क्रिकेटचे सामने गुजरातला. भाजपला गुजरातला समृद्ध करायचंय तर करा. पण महाराष्ट्रातलं ओरबाडून नेताय त्याला आमचा विरोध आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र गुजरातशासित करायचा असेल तर हा महाराष्ट्र भाजपच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही.
– या देशात जिवाला जीव देणारी माणसं आता राहिलेली नाहीत. जीव घेणारी माणसं तयार होतायत का अशी भीती वाटू लागली आहे. हल्ली मी बघतोय ही अशी विराट गर्दी व्हावी यासाठी लोकांना बिर्याणी मागवावी लागते. शिवसेनेला तसं करावं लागत नाही. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. शिवसेनेने ज्यांना मोठं केलं ती माणसं निघून गेली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं त्या माणसांना बघायला मी इथे आलो आहे. लोकांचं प्रेमाचं जे ऐश्वर्य आहे ते त्या गद्दारांच्या नशीबात नाही.
– बुलढाण्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. पण काय करतंय हे सरकार. काही दिवसांपूर्वी अवकाळीचा पाऊस पडला. आपत्ती आपलं सरकार असतानाही आली. पण त्या वेळेला लोकांना मदत मिळालेली. दोन लाखांपर्यंतची कर्ज माफ करायची योजना राबवली होती. मैदानात येऊन लोकांमध्ये जाऊन विचारा कुणाचा सरकार आवडलं. होऊन जाऊ दे सामना, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गटाला केले.
– गद्दारांना 50 खोक्यांचा हमी भाव आहे. मग माझ्या शेतकऱ्यांना का नाही. दुष्काळ उंबरठ्यावर आहे. खरीप गेला. रब्बी गेला. अनेक भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे निघाले आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आधार राहिलाय रोजगार हमी योजनेचा. बुलढाण्यात अजूनही साडे पाचशे गावात कामंच सुरू झालेली नाही. आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्यांना नाही मिळू शकत.
– मुख्यमंत्री लोकांना फोन करून विचारतायत की तुम्हाला ही योजना मिळाली की नाही, पंतप्रधान उज्वला योजनेने घरात गॅस आला की नाही. भाडोत्री माणसं ठेवून हे विचारलं जातंय. त्यातील एका शेतकऱ्याने थेट सांगितले की मुलाबाळासह आत्महत्या करू पण भाजपला मत देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
– पंतप्रधान म्हणातात आम्ही चारशे पार जाणार. चारशे पार जाणार आहात मग एवढे का घाबरला आहात? का आमच्या लोकांच्या मागे कशाला ईडी सीबीआय लावता? ईडी सीबीआय काय तुमचे घरगडी आहेत का? मला ईडी सीबीआयला सांगायचं आहे आता त्यांचे सरकार आहे. पण लवकरच आमचं सरकार येणार आहे. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही राजकारणात लुडबूड करू नका. नाहीतर तुमचं काय करायचं ते आम्ही ठऱवून ठेवलेलं आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
– उत्तरेतले सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले आङेत. ते हक्कासाठी लढत आहेत. आत्महत्या करणं हा उपाय नाही. आत्महत्या केली का काय हाल होतात त्या शेतकऱ्याच्या घरादाराचे ते बघा. जे सांगत आहेत. आत्महत्येनंतर तुम्हाला घर दिलं असं सांगितलं जातं. पण जो शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या घरावर छप्पर उडून जातं. कर्ता व्यक्ती त्यांच्यातून निघून जातो. काय करायचं आहे त्या घरादाराचं. पण तुम्ही जर असहाय्य होऊन जर आत्महत्या करणार असाल तर हे सरकार तुम्हाला चिरडणारच.
– उत्तरेतील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. त्यांच्यासमोर आता रणगाडे रॉकेट लाँचर आणून ठेवलेलं आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. दीड वर्षापूर्वीही असं आंदोलन झालं होतं. महिनाभर ते शेतकरी दिल्ली सीमेवर तंबू ठोकून बसले होकते. त्यांच्यासमोर मोदी सरकारला झुकावं लागलं होतं. याला म्हणतात जिद्द.
– माझ्या महाराष्ट्रातील ही जिद्द गेली कुठे. सिंदखेड म्हणजे जिजाऊंचं जन्मस्थान. जिजाऊंनी आपल्याला आपलं दैवत दिलं. त्या दैवताने आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. ते आपण विसरलो तर काय उपयोग. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी जर हतबलतेने आत्महत्ये कडे वळत असेल आणि पुन्हा जर गद्दार आपल्यासमोर येऊन टिमकी वाजवणार असेल तर आपल्यााला शिवरायाचं नाव घेण्याची आपली योग्यता नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
– मी राष्ट्रवादी व काँग्रेसोबत गेलो म्हणून माझ्यावर टीका होत आहे. पण भाजपने जो वचनभंग केला त्यामुळे मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो. अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत बसून अडीच अडीच वर्ष पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप करू असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री हे पद आहे की नाही. तो शब्द तुम्ही मोडला. त्यानंतर मी लोकांना काय तोंड दाखवणार होतं. मी कुणाचं कधी वाईट केलेलं नाही. शब्द मोडला त्यामुळे मी संतापलो.
– शिवसेनेने मोदीजींना संकट काळात मदत केली. वाजपेयी जेव्हा मोदीजींना कचऱ्याच्या टोपीत टाकायला निघालेले तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. स्वत: राजनाथ सिंहांनी मला फोन केला होता.
– तुम्ही म्हणता आम्ही घराणेशाहीविरोधात आहोत पण आम्ही तुमच्या हुकुमशाही व एकाधि्कारशाही विरोधात आहोत. अमित शहा अलिकडेच म्हणाले की यांची घराणेशाही संपवून टाकणार. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला व शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे असे ते म्हणातात. हो करायचे आहे पण जनतेने मतं दिली तर होईल ना मुख्यमंत्री. मुख्यमंत्रीपद म्हणजे बीसीसीआयचं पद नाही. तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे. मग जय शहाला का योगदान आहे. मुंबईची फायनलची मॅच अहमदाबादला नेणं हे त्याचं कर्तृत्व.