ठाणे – आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे माजी आमदार शंकर सखाराम नम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. शुक्रवारी त्याची तबेत बिघडल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, मुलगी असा परिवार आहे.
आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे शंकर सखाराम नम हे तीन वेळा डहाणू मतदारसंघाचे आमदार, एक वेळा खासदार तर 2 वर्षे ठाणे जिल्हा पालकमंत्री व उपमंत्री होते. डहाणू तालुक्यातील तवा या आपल्या गावातील सरपंचपदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. ते डहाणू पंचायत समिती सदस्य होते.
शंकर नम यांनी आपल्या कार्याची सुरूवात जंगल कामगार सोसायटीमधून केली. तत्कालीन डहाणू विधानसभेचे आमदार भाई कडू यांच्या निधनानंतर त्यांना काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट मिळाले व त्यांनी सुमारे १७ वर्षे डहाणू विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. या कालावधीत सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळ त्यांना दोन वर्षे पाटबंधारे, खारजमीन, आदिवासी विकास आदी विभागाचे राज्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्रीपद काम केले होते. त्यानंतर त्यांनी 1999 साली डहाणू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून लढवली व ते 11 महिने खासदार होते. तसेच राजकीय व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ते कार्यरत होते.