आर्थिक अडचणींमुळे संपवले जिवन
आत्महत्येपुर्वी मोदींना उद्देशून लिहिले पाच पानी पत्र
अलाहाबाद: आर्थिक अडचणी आणि कुटुंबियांसाठी काहीच करु न शकल्यामुळे निराश झालेल्या वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. अलाहाबाद येथील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 पानांचे पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली आहे.
बिजल दास (55 वर्ष) असं या आत्महत्या करणाऱ्या वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आसामचे राहणारे होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 11 वाजता ते या हॉटेलमध्ये आले होते. रविवारी सकाळी हॉटेलच्या रुमची सफाई करण्यासाठी कर्मचारी गेला मात्र दरवाजा बंद होता. त्यानंतर दुपारपर्यंत दरवाज बंद राहिल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. खुल्ताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुमचा दरवाजा तोडून पाहिले असता बिजल दास यांनी पंख्याला गळफास लावून घेतला होता.