इस्लामाबाद – अयोध्या निकालाच्या टायमिंगवर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी म्हटले आहे की, कर्तारपुर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या दिवशीच हा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे कर्तारपुर कॉरिडॉरच्या महत्वाच्या विषयाच्या बाबतीत मात्र फार उत्साह दाखवला गेला नाही.
वास्तविक हा सुद्धा एक मोठा आनंदाचा क्षण होता पण अयोध्या निकालाच्या टायमिंग मुळे तो हुकल्या सारखे झाले आहे असे कुरेशी यांनी म्हटले आहे. हा निकाल काही दिवस पुढे ढकलणे शक्य नव्हते काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अयोध्या निकालामुळे कर्तारपुर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या आंनदी आणि महत्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष झाल्याचा त्यांचा आक्षेप होता. अयोध्या निकाल हा एक संवेदनशील विषय आहे आणि तो विषय आजच्या कर्तारपुर कॉरिडॉर उद्घाटनाच्या दिवशी टाळायला हवा होता असे मत त्यांनी नोंदवले आहे.
ते म्हणाले की भारतातील मुस्लिम आधीच मोठ्या दबावाखाली आहेत आता या निकालामुळे त्यांच्यावरील दबाव आणखी वाढणार आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.