गुवाहाटी – भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यातील सुमारे 30,000 लोक पुराने प्रभावित झाले आहेत.
धेमाजी जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी अद्याप धोक्याची पातळीहून जास्त आहे. पुराचा सर्वाधिक फटका धेमाजी आणि दिब्रुगड जिल्ह्यांना बसला आहे.
याचा थेट परिणाम धेमाजीमधील 19,163 आणि दिब्रुगड जिल्ह्यामधील सुमारे सहा हजार लोकांना बसला आहे. धेमाजी, दिब्रुगड, दररंग, जोरहाट, गोलाघाट आणि शिवसागर जिल्ह्यातील 175 गावं पाण्याखाली गेली आहेत.