आळंदी, (वार्ताहर) – सिद्धबेट येथील बांबूच्या परिसरात शनिवारी (दि. 16) समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. त्या झाडांना आग लागल्याचे आळंदीचे व साई समृद्धी सोसायटीमधील रहिवाशांकडून यांच्याकडून पालिका, अग्निशमन दलास कळविण्यात आले.
आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तेथील आग बकेटच्या सहाय्याने आटोक्यात आणण्यात आली. तसेच आग आटोक्यात आणल्यानंत्र तेथील बाबूंच्या परिसरात बांबूच्या खालील बाजूस (पहाटे लागलेल्या आगीमुळे) तेथून धूर निघत असल्याचे एका व्यक्तीस दिसले.
त्याची माहिती पालिका अधिकार्यास दिली. तत्पर बकेट व पाण्याच्या पाइपद्वारे बांबूच्या वृक्षांच्या परिसरात पालिका कर्मचार्यांनी येऊन तिथे पाणी मारल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या आगीमध्ये काही बाबूंच्या वृक्षांची हानी झाली आहे.