मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासंदर्भात काहींची चौकशी देखील सुरु आहे. दरम्यान, ज्या कलाकारांवर अन्याय होत असेल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा… त्यांना मनसेच्या वतीने दणके देण्यात येतील’ अशी काही वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आली होती.
मात्र आता यावर खुद्द मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज म्हणाले कि, “या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!” असं राज म्हणाले.
#राजठाकरे #मनसेभूमिका #HindiFilmIndustry #SushantSinghRajput #MNS #RajThackeray pic.twitter.com/pUD1boTnSO
— Raj Thackeray (@RajThackeray) July 4, 2020
“सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद”