मुंबई – अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री करीना कपूर मुख्यभूमिकेत दिसली होती. मात्र या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या चित्रपटातील अपयशानंतर आमिर खानला मानसिक त्रास सहन करावा लागला होता. यानंतर आता ऑस्कर विजेते दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी लाल सिंग चढ्ढा चित्रपट पाहिल्यावर त्यांना काय वाटले होते. हे सांगितले आहे.
आमिरच्या चुलत भाऊ मन्सूर यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाला की, “मी जेव्हा राजामौली यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, लाल सिंग चढ्ढा पाहिल्यावर मला आमिरचा अभिनय ओव्हर अॅक्टिंग वाटला होता. आमिरचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच चांगला आहे. आमच्या नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली आहे. मात्र आमिरची अॅक्टिंग खूपच निराशाजनक होती.
मी आमिरचा भाऊ असलो म्हणून काय झाले पण त्याला खरं ते सांगितले होते. त्याला खरा रिव्हयू दिला होता. फिल्मचे लेखक अतूल कुलकर्णी यांनी चांगले काम केले होते. या चित्रपटात जास्तच अभिनय केला आणि त्यामुळे तो चर्चेत आला. प्रेक्षकांनाही ते पाहताना जाणवले. मी टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप पाहिला होता. आणि मला त्याचे कामही आवडले होते. हे मी आमिरला सांगितले होते. असेही मन्सूरनं यावेळी सांगितले.
दरम्यान, ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट एका गाजलेल्या हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक त्याने तयार केला होता. जो चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिला असल्याने या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये फार उत्सूकता जाणवली नाही. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर आमिरने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. सध्या तो त्याचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाठी आणि स्वत: साठी देण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तरी आमिरच्या नव्या प्रोजेक्टबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.