राजकीय साठमारीत अवकाळीतून शेतकऱ्यांना अवकळा
नीरा नरसिंहपूर- गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय स्थिती अस्थिर झाली आहे. त्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांचा भार राज्यपालांवर येऊन पडला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची आकडेवारी तोकडी आहे. सत्तेच्या सारीपाटावर नेते मश्गूल असताना शेतकरी दिशाहिन झाला आहे. राजकीय साठमारीत
नुकत्याच झालेल्या निवडणूक निकलानंतर 15 दिवसांपर्यंत सत्तेची संगीत खुर्ची सुरू झाली होती. त्यानंतर सत्तेचा लंबक कोणाच्या पारड्यात झुकला नसल्यामुळे अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली. त्यातच राज्याची अवस्था विशेषत: शेतकऱ्यांची दयनीय झाली आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. परतीच्या पावसाने आभाळ फाटलं. श्वास उरात लोटला. सत्तेचे गाजर दिसल्यानंतर या सर्व नेत्यांना शेतकऱ्यांचे वावर आठवते. “मी पुन्हा येईन, पुन्हा येईनचा आवाज पुन्हा पुन्हा घुमू लागला. ते म्हणणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे वळून देखील पाहिले नाही.
नेत्यांच्या प्रचाराच्या वेळेस शेतकऱ्यांची मुले एकमेकांच्या अंगावर जात होती. परंतु आत्ता सत्तेसाठी नेते मंडळी एकमेकांच्या गळ्यात गळा घालत आहेत. एखाद्या मंत्र्याचा मुलगा पंचवीस ते तीस वर्षाचा असेल तर तो आमदार होऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांचा मुलगा नोकरीला असूनही हंगामीच राहतो. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आजही असंघटीतच राहिला आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचे फावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्यासाठी कोणालाही फुरसत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गळा काढणारे सत्तेच्या पायऱ्या अलगदपणे चढून जातो. त्यानंतर शेतकऱ्यांना वाळीत टाकले जाते. अठराविश्वे दारिद्रय असलेल्या शेतकऱ्यांची झाली आहे.