नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यातून ते प्रवास करत होते.
कोईम्बतूर आणि सुलूर यादरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले होतं. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेप्रकरणी तपासाला सुरुवात झाली असून या संबंधित आता वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर काही नागरिक समोर आले होते जे घटनास्थळी लवकर पोहोचले होते. यापैकी एका प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक खुलासा केला.
एका प्रत्यक्षदर्शीने ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत दावा केलाय की, ‘मी माझ्या भावाला भेटण्यासाठी चहाच्या बागेत गेलो तेव्हा अचानक मला हेलिकॉप्टर आकाशातून पडतांना दिसलं. ते हेलिकॉप्टर काहीच क्षणात झाडावर कोसळले यावेळी हेलिकॉप्टरमधून पेट घेतलेले तीन माणसं खाली पडताना पाहिली होती. पण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा दोन मृतदेह हे हेलिकॉप्टरच्या बाजूला पडलेले होते.’
तो पुढे म्हणाला, ‘तिसरे व्यक्ती बिपीन रावत होते. मात्र मी त्यावेळी त्यांना ओळखू शकला नाही. रावत हे दुर्घटनेनंतर गंभीर जखमी झाले होते आणि ते पाणी मागत होते. पण माझ्याकडे पाणी नसल्यामुळे मी त्यांना देऊ शकलो नाही याची नंतर जेव्हा मला फोटो दाखवण्यात आला तेव्हा मला माहिती पडलं की, ते सीडीएस बिपीन रावत हे होते जे आमच्याकडून पणी मागत होते”या घटनेनंतर मी आपलं संपूर्ण मी रात्रभर झोपू शकलो नाही.माझ्या मनात सतत विचार येत होते की, आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं त्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी प्यायला पाणीही मिळू शकलं नाही.’