जयपुर – देशातील कोविडची वाढती स्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या राज्यांतील निवडणूक प्रचार सभा, राजकीय मेळावे त्वरीत थांबवावेत अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी मेळावे घेऊन गर्दी जमवण्यापेक्षा अन्य मार्गांचा वापर करून आपला प्रचार सुरू ठेवण्यास हरकत नाही. पण सध्याच्या काळात अशी हिरीरीने गर्दी जमवणे घातक आहे याची दखल निवडणूक आयोगाने तातडीने घेतली पाहिजे.
घटनात्मक तरतुदींनुसार निवडणूक प्रक्रिया टाळता येणार नाही पण राजकीय सभांना जमणारी गर्दी निश्चीतपणे टाळता येईल आणि त्या द्वारे करोना प्रसाराचा धोकाही टाळता येईल असे गेहलोत यांनी ट्विटरवर म्हटले आहे.