मुंबई : राजकीय नेतृत्वाकडून आदेश झाल्यास पाक व्याप्त काश्मीरवर ताबा मिळवू असे जे वक्तव्य लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी केले आहे त्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केले आहे.
ते म्हणाले की पाक व्याप्त काश्मीरात भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांची केंद्रे आहेत, ती नष्ट करण्याची गरज आहे.
पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि त्यावर हक्क सांगणारा ठराव भारताच्या संसदेतही संमत झाला आहे.
या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांनी जे वक्तव्य केले आहे त्याचे आपण समर्थन करतो असेही आठवले यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कराच्या सामर्थ्यावर संपुर्ण देशाचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य अवाजवी नाही असेही आठवले यांनी म्हटले आहे.