मग सस्य फळपाकांत। तैसें निमालिया कर्मजात। आत्मज्ञान गिंवसीत। अपैसें ये ।।129।। ऐसिया निगुती दोनी। त्याग संन्यास अनुष्ठानीं। पडले गा आत्मज्ञानीं। बांधती पाटु ।।130।। जें औषध व्याधी अनोळख। तें घेतलिया परतें विख। कां अन्न न मानितां भूक। मारी ना काय?।।132।। चुकलिया त्यागाचें वेझें। केला सर्वत्यागुही होय वोझें। न देखती सर्वत्र दुजें। वीतराग ते।।134।। (अध्याय 18)
धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते, तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन शोधत येते. अशा युक्तीने (नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा) त्याग व (काम्यकर्माचा) संन्यास जे करतात.
चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील, तर कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यांत पडतात. जसे रोगांची चिकित्सा न करिता घेतलेले (भलतेच) औषध विषतुल्य होते. त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधांत सापडतो.