वेठबिगारीविरुद्ध कायदाच करणार
नवी दिल्ली, दि. 19 – वेठबिगारीची प्रथा नष्ट करण्यासाठी केंद्रीय पातळीवर कायदा करण्यात येईल, असे उद्गार केंद्रीय मजूरमंत्री रघुनाथ रेड्डी यांनी राज्य मजूरमंत्र्यांच्या 26व्या परिषदेत बीोलताना काढले. ते म्हणाले, नवा आर्थिक कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जमीनदारांनी त्यांची समाजविषयक जबाबदारी ओळखावी. पिळवणूक करणे अनैतिक आहे.
शेतमजुरीत 15 ऑगस्टपासून वाढ
नवी दिल्ली – राज्यातील शेतमजुरांच्या मजुरीत 15 ऑगस्टपासून वाढ करून द्यावी, अशी सूचना केंद्र सरकार लवकरच राज्यांना करेल.
इतिहासातले नवे पर्व
अंतराळ संशोधन केंद्र – रशिया व अमेरिका यांच्या अंतराळ यानांनी एकमेकांना संलग्न केले. या घटनेमुळे मानवजातीच्या इतिहासात नवे युग निर्माण होत आहे, असे अपोलो यानाचे कमांडर स्टॅफर्ड यांनी सांगितले. तर रशियाच्या सोयुझ यानाचे कमांडर अलेक्सी लिओनोव्ह यांनी म्हटले की, सहकार्याचे वातावरण निर्माण झाल्याची ती खूण आहे. अंतराळ संशोधनाच्या कधीही न संपणाऱ्या रस्त्यावरील हे पहिले पाऊल आहे.
सोयूझ-अपोलाचा स्वतंत्र प्रवास सुरू
स्पेस सेंटर, ह्यूस्टन – संयुक्त अंतराळ उड्डाणाचा प्रयोग संपल्यानंतर सोयूझ व अपोलो ही याने जोडण्यात येऊन वेगळी करण्यात आली. दोन्ही यानांनी आपला स्वतंत्र प्रवास सुरू केला आहे.