मुंबई – जागतिक पर्यावरण दिन आज मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज संस्थेत साजरा करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज संस्थेला भेट देऊन तेथील वृक्षारोपण कार्यक्रमत सहभाग घेतला.
संस्थेच्यावतीने दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी विशेषतः मूकबधिर व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी आभासी पद्धतीने आयोजित आशेचे रोप -एक नवी सुरुवात या झाडांचे महत्त्व सांगणाऱ्या वेबिनारमध्ये आठवले सहभागी झाले.
या करोनाच्या साथीच्या काळात आपणा सर्वाना ऑक्सिजन चे महत्व पटले आहे आणि आपले पर्यावरण ठीक राहिले तर आपण ठीक राहु आणि ते नीट ठेवण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. पर्यावरण रक्षणातील आपला वाटा म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात 100 झाडे लाऊन ती जगवली पाहिजेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना सहाय्य करायला हवे असे आठवले यावेळी म्हणाले.