जालना – कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता तिसऱ्या लाटेचा धोका समोर उभा ठाकला आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी रविवारपासून (27 जून) सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
तसेच सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना 4 वाजेपर्यंत खुल्या असतील. मात्र शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत, असे जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे.
असे असतील नवीन निर्बंध –
- अंत्यविधीसाठी वीस तर लग्नविधीसाठी 50 लोकांना जमण्यास मुभा
- व्यायाम शाळा, केशकर्तनालाये, ब्युटी पार्लर 4 वाजेपर्यंत खुले राहतील.
- कृषी व कृषिसेवेला पूरक सेवा देणारी दुकाने 4 वाजेपर्यंत खुले राहतील.
- कोरोनाचे नियम पाळून मालवाहतूक सुरू राहील.
- शनिवर, रविवार या दोन दिवसात पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा उपलब्ध
- मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद
- शासकीय कार्यालये 50 % क्षमतेने सुरु राहणार असून कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे.
- सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.
- बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक
तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोनाचे नियम पाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्याची जवाबदारी जिल्हा परिषद, पोलीस विभाग, नगरपरिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर असणार आहे.