नवी दिल्ली – ढगाळ वातावरणानंतर आकाश स्वच्छ व निरभ्र झाल्याने किमान तापमानात घसरण होत असून आगामी दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवस मात्र आकाश निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली असल्याचे जाणवत आहे.
राज्यात पावसाळी वातावरण कमी झाले आहे. तसेच उत्तर भारतात धुके कायम राहिल्याने आगामी चार दिवस राज्यात देखील दाट धुके राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच उत्तरेकडील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता आहे.
निवडक शहरातील किमान तापमान
माथेरान २१, धाराशिव १९, पुणे १४, परभणी १७, जळगाव १७, अहमदनगर १५, नाशिक १६, नांदेड १८, सोलापूर २१, छत्रपती संभाजीनगर १५, महाबळेश्वर १६.
धुकं वाढणार
दुपारच्या वेळेस काही प्रमाणात तापमानात वाढ होत असली तरी रात्री गारठा वाढणार आहे. अशात मध्यरात्रीनंतर धुकं देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तीन अंशापेक्षा तापमानात घट झाल्यास धुकं मोठ्या प्रमाणात वाढू शकत.