सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील बागायत पट्टा म्हणून ओळखला जात असला तरी काही शेतकऱ्यांचा कल तरकारी व खरीप पिकांकडे वाढला आहे. सोमेश्वरनगर सह आजूबाजूच्या जिरायती भागात गेल्या दोन दिवसात पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली असून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर असल्यान काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले.
तर काही शेतकऱ्यांनी बाजरी, मका केलेली पिके वाऱ्याने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांची फुलोऱ्यात आलेली बाजरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जनावरांच्या चारा पावसामुळे खराब झाल्याने चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. बाजरीचे पीक भुईसपाट झाले.
गेली पाच वर्षात प्रथमच वेळेवर पाऊस झाल्याने बाजरीचे पिके आली होती; परंतु तीही वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली. सोमेश्वर परिसरातील सर्व शेतकऱ्यांची हिच परिस्थिती आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.