मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी,”एसटी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मी सांगितलं तुम्हाला पगार चांगला देण्याचा आपण प्रयत्न करू, आमच्या मुलाबाळांना शाळेत जाताना अडचणी येत आहेत, त्यांना गिरणी कामगारांचे उदाहरण मी दिलंय, त्यांचा पगार वेळेत याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, कुणी काही सांगत असेल त्याकडे लक्ष देऊ नका, कुणी वेगळ्या प्रवाहात जात असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणूया, असे पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या नावाने राजकारण फिरतय, साहेबांनी काहीतरी केलं म्हणून त्यांच्या नावाने राजकारण फिरतेय हे लक्षात घेतलं पाहिजे, शरद पवारांनी कधी जाती पातीचं राजकारण केलं नाही, सर्व धर्म समभाव साहेबांनी केले, उगाच बदनामी करायची, आपण काय केलं, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ठाकरे यांना राज ठाकरेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या 2 वर्षात अनेक कार्यक्रम थांबलेत, मी सकाळी 6:30 वाजता कार्यक्रम आलो आहे, बारामतीकरांना सकाळच्या कार्यक्रमाची सवय झालीय, हे तीन विचारांचे सरकार आलं आहे, काही जण म्हणत होते हे सरकार पडणार, मात्र आज अडीच वर्षे झालेत, उद्धव ठाकरेंनी खुप चागल्या प्रकारे हाताळली आहे. मी माझ्या राजकीय जीवनात सर्वांना नियम सारखा, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करणार नाही, इथल्या दूध संघाची वाट लागली, बारामती बँक बघा आणि इंदापूर बँक बघा, याला कोण जबाबदार आहे, कारखानाच्या काट्यामध्ये गडबड करणाऱ्याला मी बघतो असे अजित पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार साहेब एवढे चांगले आहेत तर पुतण्या थोडा तरी बरा असेल, अस असताना इंदापूरकरानी मला खासदारकीला मोठं मताधिक्य दिल होत. आज दूध 35 रुपये लिटर आहे, दूधाचा व्यवसाय बदलाय आहे, लाकडी लिबोडी पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहेत, ते मंजूर आधीपासून आहेत, कुणाच्या तोंडातला घास काढून घ्यायचा नाही. आज दत्ता भरणेला विरोध केला होता, त्यांच्या सरकारने आपली वाट लावली होती,